साताराः ज्ञानशिंदोरीतून विचार प्रगल्भ होतात तर सकारत्मक उर्जातून उज्वल करिअरची नवी दिशा प्राप्त होते म्हणून जीवनाच्या प्रत्येक वाटेवर विद्यार्थ्यानी सकारत्मकतेची कास धरुन पुढे गेले पाहिजे असे मत शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय कराडचे माजी प्राचार्य डॉ एस बी भिसे यांनी व्यक्त केले ते गौरीशंकरच्या इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, लिंब (बी.फार्मसी एम.फार्मसी) या महाविद्यालयात शिवाजी व़िद्यापीठ कोल्हपूर यांनी आयोजित केलेल्या पदवी प्रमाणपत्र वितरण संभारंभ 2017-18 च्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते यावेळी शिवाजी विद्यापीठाचे सदस्य डॉ एच एन मोरे संस्थेचे संचालक डॉ अनिरुध्द जगताप जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य डॉ. अधिकराव यादव प्रा.बी.आर पवार अदिची प्रमुख उपस्थिती होती
ते पुढे म्हणाले ज्ञानाचे एक शिखर तुम्ही पूर्ण केले आहात या पुढील काळातही तुम्हीला अनेक ज्ञान शिखरे प्राप्त करावायाची आहेत यासाठी तुमच्याकडे नविण्यताची व कल्पकतेची जोड हवी आहे यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे याप्रसंगी डॉ.एच.एम मोरे म्हणाले की यश अपयशाची चिंता न करता जीवनात सातत्यपूर्ण कामगिरीकडे अधिक लक्ष देवून विद्यार्थ्यानी आपले करिअर उज्वल घडावावे
यावेेळी शिवाजी विद्यापीठच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमाक प्राप्त करणारी कु.वैदाती साळवी हिचा सत्कार करण्यात आला यावेळी पदवी प्राप्त विद्यार्थी प्रियांका घाडगे वर्षा घार्गे ओमकार भंाडवलकर प्रणिता घोरपडे सुजीत मुडगूळ प्राजंल निकम सुरभी खीवनसारा सुप्रिया लोखंडे टिंव्कल पटेल याचा ही पदवी प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाचे सयोजन डॉ संतोष बेल्हेकर डॉ.राहूल जाधव यांनी केले सूत्रसंचालन प्रा.चेतना पाटील प्रास्तविक डॉ अधिकराव यादव यांनी केले.
उज्वल करिअर घडविण्यासाठी सकारात्मक उर्जा आवश्यकः डॉ.एस.बी.भिसे
RELATED ARTICLES