पाटण : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाणारे कोयना धरण दोन वर्षाच्या प्रतिक्षे नंतर 100 टि.एम.सी.च्या जवळ गेले आहे. आजचा पाणी साठा 99टि.एम.सी.असून गत वर्षी 21 ऑगस्टला 79.33 टी.एम.सी. इतका होता. चालु वर्षी कोयना धरणाचा पाणी साठा शंभरीकडे गेल्यामुळे महाराष्ट्र वरील विज आणि काही अंशी सिंचनावरील संकट दुर झाले आहे.धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 6 टि.एम.सी.ची. आवश्यकता आहे.
शेतकर्यांसह सर्वांची प्रतिक्षा लागलेले कोयना धरणाने अखेरीस100रीत प्रवेश केल्याने महाराष्ट्राने सुटकेचा स्वास सोडला.105.26 टी.एम.सी.पाणी क्षमता आसलेले कोयना धरण 99 टी. एम. सी. भरले आहे. चालु वर्षी धरण पुर्ण क्षमतेने भरेल असा सर्वांनाच विश्वास आहे. यापैकी 67.50 टी.एम. सी.पाणी विज निर्मितीसाठी तर 30 टी.एम.सी.पाणी सिंचनासाठी वापरले जाणार आहे.कोयना धरण परिसरात सध्या पाऊस मान कमी असून कोयना-12मि.मी.(4013) नवजा-22मि.मी.(4853) महाबळेश्वर-7 मि.मी.(4190) अशी पाऊसाची नोंद झाली आहे .पाटण तालुक्यात शेतातील पिकांसाठी आणखी पाऊसाची आवश्यकता आसुन शेतकरी पाऊसाच्या प्रतिक्षेत आहेत.