सातारा : तमिळनाडू व केरळमध्ये हाहाकार माजविल्यानंतर पाऊसाने व ओखी वादळाचे लोक महाराष्ट्राकडे पदार्पण केले. सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता सातारा शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस सुमारे अर्धातास पडला. दरम्यान यावेळी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
आज सोमवारी संपूर्ण दिवस वातावरणात बदल झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत बदल झाला होता. सातारा शहर तसेच संपूर्ण कराड शहर व तालुक्यात हा पाऊस पडला.
या पडलेल्या पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. ग्रामीण भागात सध्या ऊसतोड सुरु असल्याने पावसाने त्यात भर टाकल्यामुळे वाहतुक व्यवस्था काही काळ ठप्प होणार आहे. या अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग त्रस्त होणार आहे.
या अवेळी पडलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाल्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे.