म्हसवड : आपल्या देशात कष्टाला कधीच प्रतिष्ठा मिळत नाही शेतीला आपण ब्रम्हकर्म मानतो, परंतु असे असले तरी शेतीला प्रतिष्ठा मिळत नाही. नेमकी अशीच अवस्था आज माणदेशी महिलांची झालेली आहे असे मत माजी न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. दादर(मुंबई) येथील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये त्यांच्या हस्ते माणदेशी महोत्सवाचे उदघाटन झाले. त्यावेळी सांस्कतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रसिध्य अभिनेते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, कोकण आयुत्त प्रभाकर देशमुख, सहा . आयकर आयुत्त नितीन वाघमोडे, कडइउ च्या अलका मुजुमदार व माणदेश फाऊँडेशन अध्यक्षा चेतना सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदा मुबंईत प्रथमच माणदेशी महोत्सव आयोजित केला आहे.
यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी स्री-पुरूष भेदभाव यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आजही मुलीला खेळण्यासाठी बाहुली किंवा भातुकली तर मुलाला गाडी, बँट, बाँल अशी खेळणी दिली जातात. आपल्या घरातुनच भेतभाव सुरू होतो. स्वतंत्रता स्वरज्याची व्याख्या देशासोबत घरालाही लागु होते. मुलींनाही गाडी किंवा क्रिकेट खेळायला शिकवा. असे गोवारीकर यांनी सांगीतले समाज्याला पुढे नेण्यासाठी स्री-पुरूष यांनी एकत्रित प्रगती आवश्यक आहे. या महिला उद्योजकांनी संघर्ष करून मोठ्या कष्टाने यशस्वी होऊन दाखविले आहे. या खर्या अर्थाने रणरागिणी आहेत. अश्या शब्दांमध्ये गोवारीकर यांनी या महिला उद्योजकांचे कौतुक केले. हा महोत्सव बघून मलाही प्रेरणा मिळाली. हा महोत्सव म्हणजे केवळ कलेचा गौरव नसून आपल्या संस्कतीचे दर्शन आहे असेही ते म्हणाले.
माणचा भाग म्हणजे पाण्याचे दुर्भि, नेहमीच दुष्काळ.या भागाला निसर्गाची साथ नाही. अश्या भागातही निसर्गाशी संघर्ष करत या संघर्षातुन आपला गाव आणि गावातील उद्योग पुढे नेण्याची जिद्द येथील महिलांची आहे. माणदेश फाऊँडेशने या जिद्दी महिलांना साथ देऊन आणि त्या महिलांमधील कौशल्य आळखून त्यांच्या व्यवसायला मुंबईत आणले आणि या माणला नवीन अळख करून दिली.अश्या भावना सांस्कतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केल्या.
8 जानेवारी पर्यंत हा महोत्सव रवींद्र नाट्यमंदिर येथे सुरु राहणार असून या माणदेशाची असलेली जेन-घोंगडी, ज्वारी-बाजरी, मूग-मटकी या सारख्या असंख्य माणदेशी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करता येणार आहे . मुंबईकरांनी पहिल्याच दिवशी माणदेशी महोत्सवास मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. घाटावरील लोकांच्या बरोबरच मुंबईकरांचीही उपस्थिती या माणदेशी महोत्सवात आढळून आली.