Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीमोदी सरकारच्या आता घटका भरत आल्या आहेत : खा. उदयनराजे

मोदी सरकारच्या आता घटका भरत आल्या आहेत : खा. उदयनराजे

कराड : शेतकर्‍यांबाबत खोटा कळवळा दाखवणार्‍या सरकारने शेतकर्‍यांवर वेदना घेऊन रोज जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बर, अशी मानसिकता बनविण्याची वेळ आणली. या सरकारच्या घटका भरल्या आहेत. उद्याच्या निवडणूकीत जनताच त्यांना घरपोहाच करेल, असा हल्लाबोल श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला.
कराड शहरात उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. त्यात ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. राजाभाऊ पाटील-उंडाळकर, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, लोकशाही विकास आघाडी अध्यक्ष सुभाष पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, सभापती हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, सौरभ पाटील, मजहर कागदी, नंदकुमार बटाणे, माधवराव पवार, विजयसिंह यादव आदी उपस्थित होते.
देशातील 80 टक्के लोक शेतीवर आधारीत आहेत. त्यांनी तुम्हाला सत्तेवर बसविले. त्यांचा भ्रमनिरास या सरकारने केला, असे आधीच स्पष्ट करुन श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, देशातील जनता प्रचंड सहनशिल आहे. काही वेळा त्यांचे कौतूकही वाटते. जनतेच्या जीवावर मोठे झालेले लोक मस्तवाल आहेत या सरकारचे लाड आणि आपल्यावरील अन्याय लोक आजपर्यंत सहन करत आले. परंतू या पुढे असे घडणार नाही. उद्याच्या लोकसभा निवडणूकीत जनताच या सरकारला मुळासकट उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही.वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर टिका करताना उदयनराजे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून त्यांनी केवळ आडनाव घेतले. त्यांनी समाजाला कायम वंचित ठेवण्याचे काम केले.मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये झालेले निकाल आता लोकसभेच्या निकालानंतर देशभर पहायला मिळतील. त्यामुळे गेल्या 5 वर्षांतील शेतकरी आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. यावेळी केंद्रात परिवर्तन अटळ आहे. या सरकारच्या घटका भरल्या आहेत. त्यांची वेळ संपत आली आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पाच वर्षे घोरण्यात घालवली. उद्याच्या निवडणूकीत जनता त्यांनी घरपोहाच करेल. मग बसा निवांत घोरत, अशी टिकाही त्यांनी केली.थापा मारुन सत्तेवर आलेल्या सरकारने पाच वर्षे लोकांना केवळ भुलवण्याचे काम केले. एकही चांगला निर्णय या सरकारने घेतला नाही. जे घेतले ते लोकांना अडचणीच्या खाईत लोटणारे होते. आज लोक जीएसटी, नोटाबंदी सारख्या निर्णयांमुळे पिचलेत. त्यामुळे पाच वर्षांत मोदी सरकारच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. येत्या निवडणूकीत या सरकारचे नामोनिशान राहणार नाही, अशी कामगिरी आपल्याला करुन दाखवायची आहे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले. सभेस कराड पालिकेतील नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular