Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीअपघात होण्यापूर्वी शरद पवारांचा यु टर्न

अपघात होण्यापूर्वी शरद पवारांचा यु टर्न

माढा, बारामती अन् सातारा सुध्दा जिंकणारच: मुख्यमंत्री
कोरेगाव: शरद पवार यांना हवेचा रोख कळतो, असे राजकारणात सांगितले जाते, ते अगदी बरोबर आहे. त्यांना आता हवेतील बदल समजला असून, त्यांनी माढ्यातून अपघात होण्यापूर्वीच यु टर्न घेतला आहे. माढ्यात आज आम्ही विशाल जनसागर पंतप्रधानांच्या सभेत पाहिला आहे, त्यामुळे आम्हाला विश्‍वास आहे की, माढा काय अनं बारामती काय, आम्ही सातारा सुध्दा जिंकणारच. सातार्‍यातील लढाई ही राजा विरुध्द प्रजा असून, सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी नरेंद्र आण्णासाहेब पाटील हाच खासदार होणार, असा विश्‍वास मुख्यमंत्री ना. देवेंद्र ङ्गडणवीस यांनी व्यक्त केला.
कोरेगाव येथील डी.पी. भोसले कॉलेजसमोरील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, ना. डॉ. अतुल भोसले, ना.शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, जि.प.सदस्य दीपक पवार, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेश शिंदे, कराड उत्तर मतदारसंघाचे अध्यक्ष मनोजदादा घोरपडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष राहूल बर्गे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.
ना.ङ्गडवणीस पुढे म्हणाले, शरद पवार यांनी अगोदर माढ्यातून लढण्याची जोरदार तयारी केली होती. स्वत:ची उमेदवारी जाहीर करुन ते स्वत: ङ्गिरले, मात्र हवेचा रोख कळल्यानंतर त्यांनी माघार घेतली. ओपनिंग बॅट्समन म्हणून जाणार्‍या पवारांनी राखीव 12 वा खेळाडू म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला, याचाच अर्थ राज्यात सर्वत्र महायुतीला चांगले वातावरण असून, आजच्या माढ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मोठा जनसमुदाय लोटला होता. त्यामुळे माढा, बारामती आणि सातारा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लावण्याचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 50 वर्षात केले असून, जिल्ह्याचे हक्काचे पाणी इतर जिल्ह्याला देताना शांत बसण्याचे महापाप केले. पाणीदार जिल्हा असताना सुध्दा आज जिल्ह्यातील पाणी प्रश्‍न सुटू शकलेला नव्हता. युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातारा जिल्ह्याची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून सुमारे चार हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करत असताना केंद्रीय जल आयोगाची मान्यता देखील या प्रकल्पांना दिली आहे. आजच कोरेगाव तालुक्यात कठापूरमध्ये गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना प्रकल्पातील बंधार्‍याचा शेवटचा स्लॅब टाकण्यात आला आहे, ही माहिती महेश शिंदे यांनी आताच दिली आहे. आम्ही प्रामाणिकपणे पाणी योजना पूर्ण करत असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच पाणी योजनांना निधी देण्याचे काम केले आहेे. सातारा उरमोडी, वसना-वांगणासह धोम बलकवडी योजनांची कामे मार्गी लावली आहेत.
सातार्‍याची लढाई ही राजा विरुध्द प्रजा अशी आहे. राजांबद्दल मी काही बोलणार नाही, कारण सगळ्यांना सगळे माहीत आहे. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते आण्णासाहेब पाटील यांचे वारसदार असून, अत्यंत प्रामाणिक नेते आहेत. त्यांनी माथाडी कामगारांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यांना अनेकांनी प्रलोभने दाखविली, मात्र त्यांनी माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी मोठा त्याग केला आहे. 24 तास जनतेसाठी उपलब्ध असणारा आणि संघर्ष करणारा हा नेता असून, तोच आता जिल्हा पाणीदार करु शकतो, त्यामुळे जनतेचे त्याला आर्शिवाद असून, ते वाया जाणार नाहीत. याच नरेंद्र पाटील यांना तुम्ही खासदार केले तर मी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणणार आहे, असेही ना. ङ्गडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात युतीचे सरकार विराजमान झाल्यावर याच काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस हे विदर्भाचे असून, ते पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करतील, अशी टीका केली होती. मात्र आम्ही टीका टिपण्णीमध्ये पडलो नाही. आम्हाला अगोदर वाटत होते की, दोन्ही काँग्रेसने पश्‍चिम महाराष्ट्राचे नंदनवन केले आहे, मात्र भलतेच निघाले. प्रत्यक्षात पश्‍चिम महाराष्ट्र विकासापासून वंचित होता. योजनांची कामे झाली नव्हती, केवळ आकडे ङ्गुगविण्याचे काम झाले होते. मी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर विदर्भच काय मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राला न्याय देण्याचे काम केले. त्यांचा विकासाचा ब्लॅकलॉग दूर केला. एकट्या सातारा जिल्ह्याात राष्ट्रीय महामार्गासाठी चार हजार कोटी तर पाणी योजनांसाठी चार हजार कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या कार्यकाळात एकाच परिवाराने देशाचे वाटोळे केले. पणजोबा, आजी, वडील पंतप्रधान होते, मात्र त्यांना काही करता आले नाही. आईकडे सरकारची सुत्रे होती, मात्र काहीच झाले नाही. आता राहूल गांधी म्हणतात, आम्ही गरिबी दूर करणार. अरे गरिबी जनतेची दूर करणार की, तुमची हे एकदा कळू द्याच. काँग्रेसच्या कार्यकाळात एखाद्याला जर एक लाख रुपये कर्ज दिले तर त्याची परतङ्गेड कशी करणार हाच प्रश्‍न होता. त्याला विचारले तर तो म्हणायचा की कोंबड्या विकून करणार. सुरुवातीला एक कोंबडी विकत घेणार, ती चार अंडी घालणार, त्यातून चार कोंबड्या निघणार असे करत करत एका कोंबडीपासून 640 कोंबड्यांपर्यंत निर्मिती होणार आणि त्या एकदम विकून कर्ज ङ्गेडणार, अशी त्यांची भूमिका होती, अशी टीका ना. ङ्गडणवीस यांनी केली.
नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट तोङ्ग डागत सातार्‍याच्या खासदारांनी दहा वर्षात कसलेही ठोस काम केले नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, केंद्र आणि राज्य सरकारनी केलेली कामे स्वत:च्या नावावर खपविण्यात धन्यता मानल्याचे सांगितले. सातारा जिल्ह्यात जास्त धरणे असताना देखील, अनेक तालुके पाण्यावाचून उपाशी आहेत, याबद्दल वाईट वाटते. जिल्ह्याचे पाणी इतर जिल्ह्याला दिले जात असताना, खासदार महोदय शांत बसले, त्यांना सामान्य जनतेबद्दल काही देणेघेेणे नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांची चूक काय झाली, त्यांनी आरक्षणाच्या भूमिकेवर राज्यव्यापी दौरा केला, मात्र त्यांचाच काटा काढण्यात आला. अहो त्यांचा काटा कोणी काढला, हे सामान्य जनतेला माहीत आहे. त्यासाठी त्यांनी जावलीचा गडी आणला, त्याने येताना माथाडी कामगार बरोबर आणले. त्याने दहा वर्षात काही केले नाही, पाण्याचे काम केले नाही, पाणी योजना करु शकला नाही, मंत्रिपद असताना काम केले नाही, स्थानिक स्वराज्य संस्था बंद पाडण्याचे एकमेव काम केले. कोरेगाव तालुक्याचा दुष्काळ तो साधा हटवू शकला नाही. त्याला जनता काय करु शकते, हे आता दाखवूनच देणार असून, लोकसभा निवडणुकीनंतर कोरेगावातच मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा दिला. डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी कष्टातून उभारलेल्या जरंडेश्‍वर साखर कारखाना स्वस्तात लाटणार्‍यांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि कारखान्याच्या शेतकरी-सभासदांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.
महेश शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता उरमोडी, धोमच्या पाण्याकडे लक्ष घालावे आणि गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणावे, अशी विनंती केली. प्रचंड पाण्याचा सातारा जिल्हा असताना दुष्काळाचा कलंक काँग्रेस-राष्ट्रवादीने लावला आहे. दोन्ही काँग्रेसला पाणी प्रश्‍न निट समजला नाही. खासदारांना दहा वर्षात दुष्काळ मिटवता आला नाही की जनतेकडे जाता आले नाही. कोरेगावचे आमदार हे मासिक आमदार असून, केवळ पर्यटनासाठी येथे येतात, अशी टीका त्यांनी केली. महावितरण कंपनीचे कार्यालय सातार्‍यातून बारामतीला हलविले असून, साध्या कामासाठी शेतकर्‍यांना आता बारामतीच्या ङ्गेर्‍या कराव्या लागत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular