सातारा : सातारा – जावली तालुक्यातील निसर्गसंपन्न परंतु दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या बामणोली विभागातील लोकांना नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कास- बामणोली- गोगवे ते महाबळेश्वर या रस्त्याचे काम मार्गी लावल्याने मोठी गैयसोय दूर झाली आहे. मात्र, या भागातील लोकांना अतिवृष्टीमुळे रस्ता खचणे, पुलांचे नुकसान, दुर्गम भागामुळे एस. टी. बसची सोय नसने यासह आरोग्याशी निगडीत समस्या भेडसावत आहेत. या सर्व समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्या करा. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करु. काहीही झाले तरी, बामणोली विभागातील समस्या तातडीने सुटल्या पाहिजेत, अशा सुचना आ. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकार्यांना केल्या.
बामणोली विभागातील समस्यांचा निपटारा करण्यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अधिकार्यांना सूचना कराताना आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने, जावली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन भोसले, गट शिक्षणाधिकारी चव्हाण, बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णा निकम, तालुका कृषी अधिकारी माने, नायब तहसीलदार सपकाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रासकर यांच्यासह संबंधीत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीला बामणोली विभागातील जावली बाजार समितीचे संचालक राम पवार, माजी उपसभापती शंकरराव साळुंखे, बामणोलीचे माजी सरपंच यशवंत आगुंडे, कोळघरचे सरपंच लक्ष्मण शिंदे, किशोर शिंदे, विभागाचे आरपीआयचे अध्यक्ष एन.डी. कांबळे, अॅड. राजेश कांबळे, केळघर विकाससेवा सोसायटीचे चेअरमन यशवंत शिंदे, तेटलीचे सरपंच बबन भोसले, प्रकाश भोसले, केळघरचे सरपंच सौ. साळुंखे, म्हावशीचे कृष्णा शिंदे, लक्ष्मण शिंदे, विष्णू सुतार आदी मान्यवरांसह बामणोली भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.