Monday, May 19, 2025
Homeताज्या घडामोडीसर्वसामान्यांचे हित जोपासणारे खा.श्री. छ. उदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे लागतीलः बाळासाहेब भिलारे

सर्वसामान्यांचे हित जोपासणारे खा.श्री. छ. उदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे लागतीलः बाळासाहेब भिलारे

पाचगणी : या देशातील सद्याच्या राजवटीने सर्वसामान्यांचे जिवनमान उंचावण्याऐवजी आपल्या निर्णयांनी त्यांना पायदळी चिरडण्याचे काम केले. ही जुलमी राजवट हटविण्यासाठी सर्वसामान्यांचे हित जोपासणारे श्री. छ. उदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे लागतील, अशी गरज ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी व्यक्त केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाचगणीच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, नगरसेवक विठ्ठलतात्या बगाडे, दिलावर बागवान, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबूराव सपकाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष तेजस शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
पाचगणी-महाबळेश्वरच्या प्रश्नांसंदर्भात बोलताना बाळासाहेब भिलारे म्हणाले,वाढत्या लोकसंख्येचा विचार करता या दोन्हीं शहरातील एफएसआय वाढला पाहिजे. इको सेन्सेटीव्ह झोन, व्याघ्र प्रकल्पाच्या निर्बंधांमुळे पाचगणी-महाबळेश्वरला झळ पोहचली आहे. खासदार उदयनराजे- आमदार मकरंदआबा या दोघांच्या प्रयत्नांमुळे येथील प्रश्न सुटतील.
राजेंवर प्रेम करणारी ही रयत आहे. देशातील प्रथम क्रमांकाचे विक्रमी मतदान उदयनराजेंना होईल, असा विश्वासही श्री. भिलारे यांनी व्यक्त केला.
सत्ताधा-यांकडून जातीधर्माचे राजकारण सुरु आहे. जाती-जातीचा माणूस दु-याकडे संशयाने बघायला लागला आहे. हे चित्र बदलण्यासाठी येथील जनता उदयनराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल, असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला
श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात सत्ताधा-यांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश हुकूमशाहीमुळे धोक्यात आहे. आज सावरलं नाही तर देश अंध:काराच्या खाईत ढकलला जाईल. या देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित करून देशाला महासत्तेकडे न्यायचे आहे. या दृष्टीने ही निवडणुक महत्वाची आहे. या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिले, प्राणांची आहुती दिली. ते बलिदान सार्थ ठरण्यासाठी सर्वांनी या निवडणूकीत हुकमीसत्तेविरोधात एकजुट दाखवावी.
यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे, विठ्ठल बगाडे, तेजस शिंदे यांचीही भाषणे झाली. सभेस माजी सभापती सुनील काटकर, साहेबराव बिरामणे, नारायणराव बिरामणे, जि.प. सदस्या निता आखाडे, पं.स. सभापती रुपालीताई राजपुरे, नगरसेविका हेमलता गोळे, पृथ्वीराज कासुर्डे, विजय भिलारे, शेखर कासुर्डे, रेखाताई कांबळे, विठ्ठलराव गोळे, विठ्ठलराव बगाडे, विजयराव भिलारे, प्रविण भिलारे, अ‍ॅड. विकास पवार, बाळासाहेब चोरगे तसेच नागरिक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular