रहिमतपूर : कर्जबाजारीपणाला कंटाळून कोरेगाव तालुक्यातील माजी सरपंचाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कृष्णात भिकू जाधव (वय 40) असे मृताचे नाव आहे. आज मंगळवारी सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली.
कृष्णात यांनी वडिलांच्या औषधोपचारासाठी मोठी रक्कम कर्जाऊ घेतली होती. तसेच त्यांना सोसायटी व बँकेचेही कर्ज होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतात फिरून येतो असे सांगून घरातून कोंबडवाडी तलाव येथील शेतात गेले होते. दुपारी दीड वाजतण्याच्या सुमारास झाडाला गळफास घेतल्याचे आढळले. या घटनने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
या घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस स्थानकात झाली आहे