सातारा ः 2016-17 साठी निवासी वसाहतींना पाणी पुरवठा बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लागू केलेल्या नवीन पाणी कनेक्शन दरा बाबत बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेतर्फे विरोध नोंदवण्यात आला असून याबाबतचे निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकणाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर राजेंद्र अंतद यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष जाकीर मिर्झा यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळालेल्या दिनांक 27/10/2016 च्या परिपत्रकासुसार नवीन पाणी कनेक्शन मिळणेसाठी सहकारी गृह निर्माण सोसायटी व खाजगी बांधकाम व्यावसायिकांसाठी जे शासकीय दर लागू केले आहेत ते अवाजवी व अन्यायकारक आहेत. आपणाप्रमाणे आम्हांलाही याची जाणीव आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कार्यभार शक्यतो विना तोटा चालवायचा असतो, म्हणून यासाठीचा भांडवली खर्च सहकारी सोसायटी व खाजगी बांधकाम व्यावसायिकांवर लादणे योग्य नाही.
सदरचे दर हे व्यावसायिक व औद्योेगिक पाणी पुरवठा बाबत आहेत. तसेच उपरोक्त दर हे महानगर पालिका क्षेत्रासाठी योग्य असु शकतील पण सातारा सारख्या छोटया शहरांसाठी हे दर योग्य नाहीत. सातारा शहरामध्ये बांधकाम व्यवसायाची व्याप्ती ही मर्यादीत स्वरूपातच आहे व सातारा नगरपालिका ही अ वर्गात मोडत असल्याने ही वाढीव दराची मागणी अन्यायकारक आहे. आमच्या या विनंतीचा शासकीय स्तरावर पुन्हा एकदा विचार होऊन योग्य ती दर आकारणी लागू करण्यात यावी असे आवाहनी यावेळी बिल्डर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले. यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशन तर्फे नवीन पाणी कनेक्शन दरा विरोधात निवेदन सादर
RELATED ARTICLES