साताराः सातारा शहरालगत वसलेले शाहूपूरी हे मोठे उपनगर आहे. या उपनगराचा दिवसेंदिवस अधिकच विस्तार होत असून रस्ते, पाणी, पथदिवे, आरोग्य आदी मुलभूत सुविधांची कमतरता भासू नये यासाठी विविध विकासकामे मार्गी लावली असून शाहूपुरीच्या विकासासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही शाहुपूरीच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटीबध्द राहू, अशी ग्वाही आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
शाहुपूरी (ता. सातारा) येथील श्री स्वामी समर्थ मंदीर व सारडा कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 5.5 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करताना आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी माजी सरपंच भारत भोसले, अरविंद चव्हाण, दिलीप कडव, विकास देशमुख, महादेव खूडे, विजय गार्डे, नवनाथ जाधव, रमेश इंदलकर, राजू गिरी, नेताजी कुंभार, सौ. सुनिता डेरे, विद्याराणी आवळे, विक्रम पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, वाढती वस्ती आणि भौगोलिक परिस्थिती पाहता शाहुपूरीत अतिक्रमणे, सांडपाण्याचा निचरा, गटारे आदी अनेक समस्या आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामंजस्याने सोडवल्या पाहिजेत. शासनाचा निधी हा थेट ग्रामपंचायतीला मिळत असून तो निधी प्राधान्याने गावच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे. सर्वच कामांसाठी लोकप्रतिनिधींवर अललंबून न राहता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी कर्तव्य भावनेने गावचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण सदैव शाहूपूरीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील असून लवकरात लवकर उर्वरीत विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना भारत भोसले म्हणाले की, शाहुपूरीतील लोकांच्या अडीअडचणी बाबाराजेंच्या माध्यमातून सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विकासकामे दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांनी जागरुक राहणे गरजेचे असून विकासक लोकप्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तरच खर्या अर्थाने सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सुटणार आहेत. लोकप्रतिनिधींनी शाहुपूरीतील पाणीपुरवठा योजना, रस्ते, पोलीस ठाणे, पथदिवे यासारखी विकासकामे मार्गी लावून आपल्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहणे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे भोसले म्हणाले.
रघुनाथ बाबर, हणमंत पवार, विजय भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. मनोहर महामुनी यांनी प्रास्ताविक केले. जालिंदर जंगम यांनी आभार मानले. कार्यक्रमास सागर गव्हाणे, आप्पा गायकवाड, संजय वनवे, तुषार जोशी, गणेश वाघमारे यांच्यासह शाहुपूरीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येये उपस्थित होत्या.
शाहुपूरीच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्य- आ. शिवेंद्रसिंहराजे
RELATED ARTICLES