सातारा : महाबळेश्वर, कास पठार आणि बामणोली या भागातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिषय मतहत्वाचा समजला जाणार्या सातारा- कास- बामणोली- गोगवे- तापोळा ते महाबळेश्वर या रस्त्यावरील दोन टप्यांचे रुंदीकरण व सुधारणा करणे आणि जावली व वाई तालुक्यातील लोकांच्या दळणवळणासाठी शार्ट कट ठरणार्या मेढा – पाचवड रस्त्यावरील आलेवाडी ते मालदेव खिंड या भागातील रस्त्याचे रुंदीकरण करुन सुधारणा करण्याच्या कामासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाच्या वित्त विभागाने 5054 रस्ते व पूल कामांतर्गत या तीन कामांसाठी निधीची तरतूद केली आहे.
मिनी काश्मिर अशी अशी ख्याती प्राप्त झालेल्या महाबळेश्वर पाठोपाठ जागतीक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांना कास पठार, बामणोली, तापोळा आणि महाबळेश्वर पाहण्यासाठी सोयीचे ठरावे, पर्यटक आणि परिसरातील लोकांना दळणवळणासाठी सातारा- कास- बामणोली- गोगवे- तापोळा ते महाबळेश्वर (प्रजिमा 26 किमी) हा मार्ग सुकर ठरावा, वेळेची, इंधनाची आणि पर्यायाने पैशांची बचत व्हावी, यासाठी हा रस्ता खूपच महत्वाचा असल्याने या रस्त्याच्या 13/00 ते 14/200 मध्ये रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी 35 लाख तर, याच रस्त्याच्या जावली तालुक्यातील आपटी ते वाकी हद्दीतील 51/700 ते 52/900 या भागाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 35 लाख रुपये निधीची तरतूद आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून करण्यात आली आहे. पर्यटनावाढीच्या दृष्टीने आणि कास, बामणोली भागातील लोकांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी सातारा- कास- बामणोली- गोगवे- तापोळा ते महाबळेश्वर हा रस्ता खूपच महत्वाचा असल्याने सातारा- जावली मतदारसंघातून जाणार्या या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यानुसार रस्त्याचे काम पुर्णत्वास जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जावली व वाई या दोन्ही तालुक्यांना जोडणारा शॉर्ट कट म्हणून मेढा- पाचवड रस्त्याला ओळखले जाते. दोन्ही तालुक्यातील लोकांना बाजारहाट आणि विविध कामानिमीत्त दळणवळणासाठी हा रस्ता खूपच महत्वाचा असल्याने या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले आहे. याच रस्त्यावरील आलेवाडी ते मालदेव खिंड (53/00 ते 54/00) या भागात रस्त्याचे रुंदीकरण करुन सुधारणा करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून 30 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या 19 किलोमीटर रस्त्याचा जावली तालुक्यातील संपुर्ण भाग रुंद आणि डांबरी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष लक्ष दिले आहे. सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचा संकल्प आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला असून तो पुर्णत्वास गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मतदारसंघातील बहुतांश सर्व गावात डांबरी रस्ता पोहचला आहे. ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत, किंवा ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अशा कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाची चांगली व दर्जेदार सोय उपलब्ध करुन देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने सांगितले आहे. दरम्यान, मंजूर रस्त्यांच्या दुरुस्तीची व डांबरीकरणाची कामे दर्जेदार करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केल्या आहेत.
सातारा- जावलीतील महत्वाच्या दोन रस्त्यांसाठी 1 कोटी निधीची तरतूद
RELATED ARTICLES