मायणी( प्रतिनिधी ) : ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक वृत्तीचे असतात .विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञानाचा वापर जीवनात कसा केला जातो याचे ज्ञान होण्यास मदत होते .विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता व कल्पना शक्तीला निश्चितपणाने वाव मिळतो ,असे प्रतिपादन खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे यांनी केले .
रयत शिक्षण संस्थेचा महर्षी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ४३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक या नात्याने बोलत होते .यावेळी खटाव प. समितीचे उपसभापती कैलास घाडगे ,जि. प .सदस्या सो.कल्पना खाडे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, पंचायत समिती सदस्या सौ. मेघा पुकळे ,नंदकुमार मोरे, एनकूळ च्या सरपंच सौ. सारिका खाडे, निढळ हायस्कूलचे मुख्याध्यापक गोडसे , छ. शिवाजी कॉलेज वडूजचे प्राचार्य पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी बोलतांना खटाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे म्हणाले भारत देश हा बुद्धिवंताची खाण आहे .जगात सर्वात जास्त बुद्धीमान लोक भारत देशात राहतात हे सिद्ध झाले आहे .अमेरिका सारख्या देशातही उच्च पदावर भारतीय लोक कार्य करीत आहेत .विज्ञान युगात सध्या विज्ञानाचा दुरुपयोगच जास्त होत असल्याचे जाणवते.विज्ञानाचा वापर सकारात्मक व मानवाच्या कल्याणासाठी केला तर त्यातून आदर्श मानव तयार होण्यास याचा उपयोग होईल .वैज्ञानिक दृष्टीचा नकारात्मक उपयोग केल्यानेच आज विज्ञान युगात देखील माणूस हरवल्याचे चित्र पाहावयास मिळते .
प्रास्ताविकात महर्षी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस .डी. बोटे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला .विद्यालयाच्या अद्ययावत इमारतीमध्ये विद्यार्थी अष्टपैलू बनविण्याचा विद्यालयातून प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले .या प्रसंगी पं. स. सदस्य सौ मेघा पुकळे ,खटाव पं. समितीच्या विस्तार अधिकारी सौ.जाधव या उपस्थितांमध्ये केंद्रप्रमुख सौ. कांचन गरवारे या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून ९३ माध्यमिक विभागातून ७३शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २४उपक्रम सादर करण्यात आली होती .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सुरमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सूरजला राजमाने यांनी केले .
ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक वृत्तीचे असतात : संदीप मांडवे
RELATED ARTICLES