मायणी :- (सतीश डोंगरे मायणी)
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वन्य प्राण्यांचे जीवनचक्र सदैव सुरू राहणे गरजेचे आहे . या जीवनचक्रात महत्वाची भूमिका असणारे सरपटणारे जीव अर्थात सापांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे . शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांच्या संख्येवर सर्पांकडून नियंत्रण ठेवले जाते यामुळे साप हे शेतकऱ्यांचे मित्रा म्हणूनही ओळखले जातात. हे सरपटणारे जीव मानवी वस्तीत दिसताच त्यांना न घाबरता सर्पमित्रांना अथवा वनविभागाला तात्काळ संपर्क करून या प्राण्यांचे जीव वाचवून त्यांना लोकांनी जतन केले पाहिजे . असे मत वनपरिमंडल अधिकारी एम बी शिंदे यांनी व्यक्त केले . ते मायणी येथील लोकवस्तीत पकडलेल्या विषारी घोणस जातीच्या व अन्य सापांना वन क्षेत्रात सोडताना मायणीतील गणेश शिंदे ,विजय सावंत ,रोहित कुंभार या सर्पमित्रांचे कौतुक करताना बोलत होते .
यावेळी ,नियतक्षेत्र अधिकारी डी व्ही लोखंडे,डी एम जानकर,मायणी येथील सर्पमित्र गणेश शिंदे,रोहित कुंभार,अँड मयुरेश देशपांडे व वन विभाग कर्मचारी मोहन जाधव उपस्थित होते.
मायणीतील सर्पमित्रांनी आजवर शेकडो सर्पजीवांना जीवदान दिले आहे . यापुढेही त्यांनी हे कार्य सुरू ठेवावे ,व मायणी व परिसरातील नागरिकांनी लोकवस्तीत सर्प आढळून आले त्यांना न मारता वनविभाग अथवा सर्पमित्रांना संपर्क करण्याचे आवाहनही श्री शिंदे यांनी केले.
मायणीतील सर्पमित्र संपर्क नंबर गणेश शिंदे ९०९६३००९१३,विजय(पिण्या) सावंत ९६०७३७२४२५,रोहित कुंभार ९५९५५९९५७६.